शुक्रवार, सप्टेंबर ०२, २०११

धन्यं जीवन....


हृदय गुंतले कि प्रेम होते !

मन जुळले कि नाते होते ! 

विचार जुळले कि मैत्री होते !

परी सर्व जुळले कि दु:ख का येते !!!




शौर्य दाखविण्या युद्ध जमावे

मैत्र मिळण्या वैर्य नसावे

सुख मिळविण्या ध्येर्य हवे

परी दुख शमविण्या क्रौर्य का हवे !!!





माया दाखविण्या वात्सल्य हवे

कौशल्यवतीन बुद्धिवान हवे

पराक्रमाधीन होण्या बाल हवे

परी नसल्यास सारे रंक म्हणे !!!




दाही दिशीस समाज हा सारा

समाज म्हणजे काय जीवन पसारा

जगण्यासाठी स्वकष्ट हवे

घेतल्यास उपकार का नष्ट व्हावे !!!



४ टिप्पण्या: