मानेवरच्या तलवारीची धार का बोथटली
त्या रक्तरंजित दिवसांची आठवण तयांच्या मनी खुंटली,
वाघ गेला लांडगा आला कारभार राज्यास तयांचा कधी न उमगला,
थेंब थेंब रक्त सांडते तरी भ्रष्ट कारभार नाही सुटला,
श्वास तुटला, विश्वास मुकला, बधीर होऊनी किंकाळ्या मात्र ऐकल्या,
येवून थाटती बाजार लाज का मनी नाही उरली,
सोन्याची या माती केली, दगडांवरती पदे कोरली,
पितळ पांढरी मने ज्यांची जाहली. कृतघ्नतेची परिसीमा गाठली,
मरताची रोजची मुंगीपरी माणसे म्हणुनी वाच्यता कशी करुनी सोडली,
पैशांच्या बाजारी विकुनी माय आपुली दान धर्माच्या नावाखाली त्याची दिसे काळी सावली,
मरणाच्या सद्जनाच्या पैशांची देतात जांभई,
खूपच भारी बुवा अगदी परिपक्व लेखकाप्रमाणे लिहिले आहेस. खूपच छान आवडले.
उत्तर द्याहटवामंदार धन्यु रे,
उत्तर द्याहटवागजानन अरे रागाच्या भरात काय घडते. सांगू शकत का कुणी! आणि धन्यवाद रे तुला आवडली त्यातच धन्य
:((
उत्तर द्याहटवाप्राची धन्यु (कमेंट ?)
उत्तर द्याहटवा