शनिवार, मार्च १७, २०१२

एक कृष्ण जाहला रे


अज्ञात या प्रेमाचा उलगडा न लागला रे !
मनी माझ्या जणू तूची एक कृष्ण जाहला रे !!

एकाच कडेचा मनी परी द्वंद का लागला रे !
तुज मोहणे जड मज मनी असंख्य बंध का रे !
प्रेमे आनंदे नाहि मी एकतर्फी जाहले रे !!
मनी माझ्या जणू तूची एक कृष्ण जाहला रे !!

आठवणीत तुझ्या अंगी माझ्या शहारे भारले रे !
एक झलक पाहताची मनी या तारे बरसले रे !
तुटलेले प्रेम जरी तुझ्या प्रेमरंगी रंगले रे !!
मनी माझ्या जणू तूची एक कृष्ण जाहला रे !!

डोळ्यात माझ्या तुझे रूप कसे साठवू रे !
जरी अनामिक नाते हे तुवा कसे जोडू पाहू रे !
नक्षत्रे परी ओघळली, नयनी अश्रू तरळले रे !!
मनी माझ्या जणू तूची एक कृष्ण जाहला रे !!

अस्ताव्यस्त स्वप्ने, उध्वस्त का ते वादळ रे !
ओळख कुठली माझी मी तुझ्यात हरले रे !
एक सावली जणू मी नाही तुझी राधा रे !!
मनी माझ्या जणू तूची एक कृष्ण जाहला रे !!

प्रेम न मिळले जरी, जन्म पडला भाळी रे !
आरंभ तूची म्हणोनी, दिन-रात्र माझी काळी रे !
प्रेम का ते दैन्य पदरी मी ना तुझी मीरा रे !!
मनी माझ्या जणू तूची एक कृष्ण जाहला रे !!

का मृत्यू आजी ना विचारी मजसी रे !
शांती या मनीची कैशी क्षणात विझली रे !
सखा का प्रेम माझा सांग तू कान्हा रे !!
मनी माझ्या जणू तूची एक कृष्ण जाहला रे !!

बुधवार, मार्च १४, २०१२

सावज झाली मने



गर्द कोवळ्या मनाची हा कुठे श्वास कोंडला!
काळोखाच्या उंबऱ्यात का जीव असा सोडला!!
धुंद विश्वात जगणे आतुर भेटी बहु पाहुणे!
काळोखी जणू मनुचीया हि सावज झाली मने!! धृ.!!

हृदयी प्रेमे, चेहरे अनामिक काळजात ठासले!
एकलाची जणू जीव जगी या जगण्यास फेकले!!
प्रश्नाच्या या जंजाळातून उत्तरे ना स्तवने!!१.!!
काळोखी जणू मनुचीया.....

तव धनुष्या टोकावरची धार पुनः बोथटली!
सप्त रंगांच्या आयुष्यात हि काळरात्र पसरली!!
मन हे आतुर, वेडे फिरुनी लक्ष जाळी हि हवने!!२.!!
काळोखी जणू मनुचीया.....

रात्र दिव्यांची, दिन अंधारी तुटते रे आतडे!
गर्दीत जणू चिरडले रे दुखी-व्याधीत कातडे!!
पाषाणाच्या प्रेमापोटी खंडित हृदय अन मने!!३.!!
काळोखी जणू मनुचीया.....

संसाराचा हा रे पसारा क्षणभंगुर न वाटे!
दुख एकीचे वाटुनी सगळे शंका मनी का दाटे!!
विश्वासाचा धागा तोडूनी नाती न जोडणे!!४.!!
काळोखी जणू मनुचीया.....

कास लक्ष्मीची, आर्त भुकेची पापांची माऊली!
ओसाड पडती मग पुण्ये हि फोडती रे टाहोळी!!
अश्रूंच्या त्या हिंदोळ्यावर आटती हि स्पंदने!!५.!!
काळोखी जणू मनुचीया.....

मंगळवार, डिसेंबर २७, २०११

ठाणे-पुणे-ठाणे



                       प्रवास !!!, हा प्रवास आपल्या सारख्या सामान्य माणसांना कधी चुकलाय का? जीवनाचा प्रवास असो किंवा बैलगाडी-घोडागाडी, चालत वैगेरे कसाही प्रवास असो, आपल्या नशिबी प्रवास कधीही येऊ शकतो. ह माहिती आहे कि  हे जरा अतीच होतंय पण माझा तुम्हाला एक प्रवास वर्णन सांगण्याचा हा एक प्रयत्न आहे.
                      माझा प्रवास होता ट्रेनचा!! नॉर्मली आपण तो रोजच अनुभवतो पण त्यात आजू बाजूला घडणाऱ्या  काही बारीक घडामोडींवर आपले कधी लक्ष जात नाही. मागे गुगल प्लस आणि मेल द्वारे मी आणि माझे नेट वरील जमलेले मित्र मिळून पुन्हा एकदा भेटण्याचा विचार मनात आणतच होतो. आमची मागची पहिली बझ्झ भेट अतिशय आठवण जागवणारी होती. म्हणून पुन्हा एकदा भेटण्याचे आम्ही ठरवू पाहत होतो. कारण मैत्रीची ओढ काही वेगळीच असते आणि तसच मैत्रीचा आमच्या प्रवासाशी जरा घट्टच संबंध आहे बर का मंडळी!
                     तर आमची दुसरी बझ्झ मंडळ भेट म्हणजेच स्मरणीय भेट जीच्या प्रवासाचे कौतुक जरा सांगण्यासारखे आहे. आम्ही पुण्या - मुंबईतल्या सर्व बझ्झ-मित्रांनी ठरवले कि पुन्हा एकदा भेटायचे जसे ठरवले तशी आमची तयारी जोशात सुरु झालेली होती, मुंबईहून कोण? पुण्यातून कोण? स्वागत कस करणार? कोण कोण भेटणार? काय काय कार्यक्रम करायचे? कस भेटायचे? वैगेरे वैगेरे अस सर्व काही आम्ही ठरवून
२५-१२-२०१२ ला पुन्हा भेटण्याचे निश्चित करून तयार झालो. आणि त्याप्रमाणे तो दिवस ठरवून आम्ही मोकळे सुद्धा झालो.                 
                      बझ्झ भेटीच्या प्रवासाचा तो दिवस नाही नाही म्हणता उजाडलाच..... पहाट झाली. आम्ही सर्व मुंबईतले मित्र एकमेकांच्या सानिद्ध्यात फोन वरून होतोच. सकाळ झाली, थंडीही खूप होती मी आणि भांडुपचे तिघे तयारी करून घरातून निघाले. रस्त्यात गाडीची वेळ, पोहोचण्याचा वेळ इत्यादींचा अभ्यास करत करत आम्ही ठाणे स्टेशनला भेटलो, रम्य पहाट, गुलाबी थंडी अश्या सुंदर वेळेचा स्टेशन वर अनुभव काय सांगावा. एरव्ही कर्णकर्कश्य वाटणारी ती अनाउन्समेंट जराशी मृदुल वाटत होती, समोर दूर रेल्वे पटरीवर पसरलेले पांढरे शुभ्र धुके, आणि त्या धुक्यातून हळूंच किंवा धाडधाड बाहेर येणाऱ्या-जाणाऱ्या गाड्या असे वाटत होते. कि ढगांतून रेल्वे ये-जा करतीये कि काय? पण दृश्य मात्र सुंदरच वाटत होते. आम्ही सर्वच भेटलो खरे पण त्यात हि एकजण  उल्हासनगर वरून येणार होता. ७.३० वाजता आमच्या इंटरसिटी एक्स्प्रेसची यायची वेळ ठरलेली  आणि आमच्या उल्हासनगरीय प्रवाश्याचा पत्ताच नव्हता.(तसा तो पण मध्य रेल्वेचा प्रवासीच शेवटी) त्याने कल्याणहून पाचारण केल्या केल्या कळविले होते, पण ७.०० वाजे पर्यंत तरी त्याचा आम्हाला पत्ता नव्हता. सात चे सव्वा सात झाले पण पोहोचलेला नव्हता, "उगाच काढलेलं तिकीट फुकट जायचे!" (पक्का पुणेरी विचार माझ्या मनात चुकचुकला), शेवटी २-३ मिनिटांनी फोन आला कि कळव्याला गाडी पोहोचते आहे म्हणून पण इथे ७.३० ची गाडीची वेळ जवळ येऊ लागली होती. समोर कल्याण बाजू ने एक गाडी येताना दिसली तशी ती जरा घाईतच होती जणू पटापट आली काम उरकून निघून गेली, आम्ही मित्राला विचारले त्या गाडीत आहेस का म्हणून पण तो तिच्या मागच्या गाडीत होता इथे वेळ झटपट निघून चालली होती. थोड्याच वेळात समोरच्या धुक्याच्या दुलईतून हळूच पडदा बाजूला सारून एक गाडी पुढे सरकतीये अस दिसलं पण इथे आमच्या गाडीची अनाउन्समेंट चालू झाली. आणि लागलीच समोर भोंगा वाजला. लगेच आम्ही मित्राला फोन लावला आणि तो त्या समोरच्या ट्रेन मध्ये होता हे कळल.
                     इथे आमची गाडी स्टेशनात शिरायची आणि त्याची गाडी हळू हळू तिकडून स्टेशनात शिरण्याची एकाच वेळ झाली. आम्ही तटस्थ मतांनी होतो कि या शर्यतीत आमचा मित्र येतो पुढे कि आमची गाडी आणि आमची गाडी झटपट आली. मित्राची गाडी जणू रात्रभर काम करून थकली होती बिचारी अर्ध्या वाटेतच थांबली.(सिग्नल दिला हो तिला), आम्ही पटपट ट्रेन मध्ये चढलो. आणि उभ राहायला जागा शोधू लागलो. मित्र तर मागेच राहिला आम्ही त्याला फोन वरून बाय बाय करून पुढे निघालो तो मागच्या गाडीने येणार होता. माझा पुणेरी विचार खरा ठरला. फुकट तर फुकट जाऊ दे म्हणून मुंबैकरांसारखा शांत झालो, जनरल डब्ब्याचे  तिकीट काढून आम्ही आरक्षित डब्यात चढायचे साहस केले. पुढे इथे फक्त बसलेल्यांना तिकीट विचारले जाते उभ राहणाऱ्यांना  कुणीही, काहीही, कधीही बोलत नाही हे तेव्हा समजल! खाली जागा शोधण्यासाठी आम्ही एका मेकाच्या मागे ट्रेन मध्ये झुक झुक गाडी खेळत होतो पण शेवटी एका जागी शांत उभे राहून पुढचा प्रवास सुरु ठेवला. पुण्यात उतरतांना मात्र गम्मत का बार फुट गया आमच्या मधला एकजण (नाव घेणे करू शकत नाही) रेल्वेच्या डब्ब्यातल्या बाथरूमचा आवर्जून उपयोग करायला विसरला नाही तो बाथरूमात गेला खरा पण बाहेरून कुणीतरी कदीच घातली, आमची फलाटावर शोधाशोध पण चौथा काही सापडेना नंतर फोन खणखणला आणि आम्हाला समजले आमच्या बंदिवान मित्राची सद्यस्तीथी मग त्याच्या बाहेर आल्यावर आम्ही स्टेशनातून बाहेर पडलो. वेळेवर पुण्यात पोहोचून आम्ही पुण्याच प्राध्यापिक स्वागत सहन केले. आणि नंतर सर्व मित्रांसकट आमच्या बिछडलेल्या मित्रालाही भेटलो.
                    दिवसभराची भेट आवरून आम्ही सायंकाळी पुण्याहून मुंबईच्या परतीच्या प्रवासाला तयार झालो. पुणे स्टेशनला आल्यावर तिकिटे काढून आमच्या प्रवासाला सुरुवात  केली ते पण इंद्रायणीचे प्रवासी म्हणून, आत आल्यावर गाडी आमच्या स्वागताला उभीच होती. आम्ही खान पानाची तयारी जय्यत केली होती. गाडीत शिरल्यावर उभे राहण्यास सुद्धा जागा भेटत नव्हती आणि दिवसभर भटकल्याने पायांत त्राण  उरले नव्हते. पुन्हा एकामागे एक असे ट्रेन मध्ये आमची झुक झुक गाडी सुरु झाली आणि आम्ही ५-६ डबे पुढे गेलो त्यात मध्येच बसलेल्या आय बाया आमच्या नावाने शिव्या घालत होत्या. पाठीवर ब्यागा आणि धडा धडा पुढे चालताना कुणाच्या पायावर पाय तर कुणाला धक्का लागत होता. पण इंग्रजांच्या कृपेने आम्ही सोर्री सोर्री चा सूर करत पुढे पुढे सरकलो, पुढ पर्यंत जाऊन हि आम्हाला साधी उभ राहायला जागा मिळाली नाही. शेवटी पुन्हा आल्या पाऊली पुन्हा मागे फिरून पुन्हा ६ डबे ओलांडून, शेकडो लोकांना ओलांडून आणि शेकडो लोकांच्या करोडो शिव्या जश्या येताना खाल्ल्या तश्या जाताना खायची तयारी दाखवून आम्ही पाच साहसी मुलांनी पुन्हा आमची झुक झुक गाडी चालू केली..... आणि पोहोचलो शेवटच्या महिला वर्ग आरक्षित डब्यात..... डब्यात मोजून १० - १२ बायका पण पुरुषांनी बायकांच्या डब्ब्यात जायचं म्हणजे अनर्थच!!!!! तरीही आम्ही बिचारे गरीब दरवाज्याच्या बाजूला दबा धरून बसल्यासारखे बसलो आणि प्रवासाची मजा लुटून घेत होतो. थंडीने गार पडलेले आमचे नाक आणि गार वाऱ्याने शरीराची होणारी कुडकुड सहन करत आम्ही एक एक स्टेशन पार करत ठाण्याला उतरलो.
                   मित्रांनो एक प्रवास पण असंख्य गोष्टी ज्या पुरतात आपल्या आयुष्याच्या प्रत्येक क्षणाला त्या अनुभवायला आपण फक्त एक मजेदार प्रवास करायला पाहिजे असतो. आमचा प्रवास सुखकर झाला नसला तरी सुखद, शुभ झाला म्हणून आम्ही तृप्त होतोच आणि त्यासाठी मध्य रेल्वेचे आभार हि तेव्हडेच होते...... मग तुम्ही कधी करणार आहात प्रवास?  

सोमवार, डिसेंबर २६, २०११

स्मरणीय भेट!!!

नयनी अश्रूंनी घर केले!! कारण फक्त मैत्रीचा खेळ!!
बझ्झ भेटीची येता आठवण!! परी निभवला वेळ!!



              आठवतो का तो एक दिवस उनाडकीचा..., खर तर आठवणी कधीही निघून जात नाही. किंवा पुसून जात नाहीत. रक्तात वसलेल्या असतात त्या कश्या निघणार?

            मैत्रीचे विश्व म्हणजे वेड्यांचे जग!! अशीच झालेली ती पहिली भेट पुन्हा खुणावत होती. आपल्या सर्व बझ्झकरांना, गेले महिना भर तसाच हो, नाही, नक्की, पक्का, माहित नाही चा तो सूर, भेटण्यास पुन: आतुर झालेले ते मन, आणि रक्तात वसलेल्या त्या घट्ट आठवणी उसळून आल्या आणि पुन्हा बझ्झ भेट पुणे यथे  करायची ठरले. गणरायाची कृपा सदैव राहिलीच आहे सर्वांवर! आणि झालेही तसेच, पुण्याला मुंबईच्या आम्हा पाच जणांची ठाणे - पुणे - ठाणे स्वारी निघाली, त्यात घडलेल्या असंख्य पराक्रमांनी तर प्रवास गाजवला. तो सांगायला विसरणार कसे?

              बझ्झ मित्र मंडळ आणि त्याचे हे सर्व मित्रगण पुन्हा एकमेकांच्या भेटीला उत्सुक होऊन सज्ज झाले. पुण्यात पुणेकरांनी सकाळपासूनच तयारी लावली होती आणि क्रिसमसच्या शुभ मुहूर्तावर भेट झालीच. मुंबई ठाण्याचे ४ महारथी आणि १ रणरागिणी सकाळ सकाळ सिंहगडाच्या गाडीत आरक्षित बोगीत (जनरलचे तिकीट काढूनहि) स्वर झाले. आणि पुणे वारीस निघाले. अधांतरी अवस्था कशी असावी हे तेव्हाच समजले. आपण आपल्या मित्रांना भेटणार पुन्हा! ते सुद्धा इतक्या कालावधीने! यानेच जीव सोकावला होताच.. अगदी मागच्यावेळी जसे भेटायला आतुर कि उतावीळ झालेले ते कासावीस मन पुन्हा नजरेस पडले. अवघ्या १२ - १३ जणांसोबत मित्रांची हि भेट सुद्धा पूर्ण केली. वास्तविक पाहता मागील वेळीस ठरवलेल्या २० - ३० जणांपैकी जसे १२ - १५ लोक जमले तसेच या वेळी देखील झाले. पुणेकरांनी एक एक करून स्वागत केले. मुंबईला रस्ता दाखविणे कठीण मग पुणे स्थानकात पाय टेकवल्या टेकवल्या कुणी घ्यायला आले आहे का? अशी भिरभिरती शाळेच्या लहान मुलाची नजरच फिरत होती. पण इथे थोड स्वतःच ओझ पुण्यात स्वतःनेच ओढावे ची जाणीव झाली आणि आम्ही पुढच्या रस्त्यास लागलो रस्ता विचारत विचारत (मुख्य:त प्रत्येकाने "कसे जावे?" चे उत्तर सरळ दिले) चालत स्वारगेट गाठायचे ठरले. पण थोडा रस्ता पुढे गेल्यावर उमगू लागले कि चालत जाणे हा यावर उपाय नाही (मुंबईची सवय शेवटी धावत जग) म्हणून सरळ समोरच्या बसमध्ये आम्ही चढलो. काही माहित नाही कि हि बस कुठे जाते? नी कुठे नाही? अगदी मुंबईत पहिल्यांदा आलेला भैय्या आठवला मला तर! पण हळू हळू "पी एम टी" ने आम्हाला स्वारगेट दाखवले. रस्त्यात किती गोष्टी आम्ही मिस केल्या देव जाणे! शेवटी लाले लाल स्वारगेट समोरच होता. पुढचा प्रवास करायच्या आधी आमचे परम मित्रांत शर्यत लागली होती जणू एक बाजूने अलोक आणि एक बाजूने वैशाली कुणीतरी पंधरा मिनिटात येयील या आशेने आम्ही लाल लाल बस आडून पाहत होतो. सशक्त पहारा लावल्या सारख्या सर्व यष्टीच्या बसेस समोर उभ्या पण त्यातल्या त्यात पिवळ्या पिवळ्या रंगाच्या रथातला आमचा पाहीला कृष्ण दिसला.
               पहिला कृष्ण अलोक आला आणि आम्हाला पुण्यात पहिला आनंद झाला. त्याने आमचे स्वागत केले तेही काहीही माहित नसताना कारण त्याने महिनाआधी पासून चालेली भेटीची पोस्ट आणि मेल पाहिलेच नव्हते. फक्त माझ्या सकाळच्या फोन वरून तो तयार होऊन पळत पळत आपली बाइक घेऊन आला. आणि आमच्या स्वागताला लागला. पुण्याच्या प्रसिद्ध हॉटेलात आम्ही न्याहारी उरकली तिथेच आम्ह्चे स्वागत पूर्ण करायला एक मराठी तारका उगवली आणि ते हॉटेल पंचताराकिंत भासू लागले. त्या तारकेने आम्हाला पुढचा सारस बागेचा रस्ता दाखवायला सुरुवात केली तसे आम्ही सर्व त्या दिशेला निघालो. कृष्ण तरी रथ घेवून पळाला. बागेत पोहचून आम्ही जगस्वामी गणरायाच्या दर्शनाला गेलो सिद्धिविनायकाचे दर्शन आणि समोर आमच्या मित्रांचा घोळका पाहून आमचा जीव सुखांतिक झाला आणि प्रवासातला सर्व थकवा निघून गेला. तिथे सर्वांचा परिचय तसेच जुळलेल्या नवीन नात्यांची ओळख झाली आणि बझ्झवर आमच्या मंडळाला झालेले फायदे सुद्धा कळले.

                                         रंजक सोहळा भासला, मज ऐसा मैत्रगण मिळाला !!!
                                         स्वामि निष्ठेस राही मन तैसा भेटीचा सोहळा जाहला !!!

तृप्त झालेल्या मनाला विश्रांती दिली. आणि सगळ्यांचा पुढचा प्रवास चालू झाला. त्यात पुण्याच्या आमच्या मित्र मैत्रिणीनी खूप मोलाचा सहभाग दिला. त्यात एक नवा आणि मानाचा चेहरा होता तो म्हणजे श्री. राज जैन आणि श्री. चैतन्य जोगदेव यांचा त्यांनी आम्हा सर्वांना खडकवासलाच्या निसर्गरम्य ठिकाणाचा आस्वाद लुटण्यास नेले त्यात महत्वाची भेट ठरली ती होती आमच्या धावत्या निखीलची!!!!!!!!!!!!!! खूप प्रसन्न असे त्याचे स्वगतातिथ्य अप्रतिम होते. नाम मात्र नसलेली हि मैत्री किती महत्वाची आहे ते चैतन्य आणि विनिताच्या त्यांच्या स्वतःच्या कामाला सोडून काढण्यात आलेल्या वेळेचे महत्व जाणून समजले. निवेदिता पाटील - जैन आणि राज जैन यांनी सुद्धा आपल्या महत्वाच्या वेळेचा भाग सुद्धा या भेटीला दिला, धावत पळत आलेले निखील, अलोक आणि वैशाली यांनी आम्हाला अगणित आनंद दिलाय, भेटीत शांतता बाळगलेल्या भरतचे कौतुक करावे तेव्हडे कमी एरव्ही फेसबुक, गुगल+, बझ्झ आपल्या सगुणरुपी जोक्स आणि पोस्टने खिदळवून सोडणाऱ्या या भरतने मागच्या वेळी शांतीस्वरूप वैशालीची आठवण करून दिली हे नक्कीच! निलेश कुलकर्णीचा तोल जबरदस्तीने आठवावा असा आठवला! खडकवासल्याच्या छोट्या दगडांनी सुद्धा त्याला हुलकावणी दिली होती. 

                    पुणे भेट मध्यावर पोहोचली आणि खडकवासल्याच्या तलावाशेजारी मस्त भजी,वडे, शेव-पुरी, चाट, यांचा मनसोक्त आनंद घेवून आणि तलावाची मनमोकळी हवा खावून सुप्रसिद्ध टमटम गाड्या पुन्हा सज्ज झाल्या आमच्या पुढच्या प्रवासाला साथ द्यायला. आम्ही टमटमने डोणगे फाट्यावर उतरलो समोरच्या हॉटेल मध्ये चहाचा आस्वाद घेवून आम्ही सिंहगड सर करायचा कि नाही याची वाट पाहू लागलो, सिंहगड सर करावा कि नाही याची जवाबदारी शेवटी राजेंवर येवून ठेपली, वेळेच्या बंधनाने सिंहगड रद्द केला आणि पुन्हा टमटममध्ये बसून पुण्याच्या सारसबागेचा रस्ता धरला. सर्वजण हळू हळू येऊन तिथे पोहोचले. आमची मंडळी बागेत जाऊन बसली स्नेहा आणि अतुल फोटोशूटच्या निम्मित्ताने त्यांच्या सोबतच गेले, पण जरा अजून थोडी रंगत चढविण्याकरिता मी आणि गणेशने थोडा वेगळा कार्यक्रम आखला. निवेदिता आणि राजे तसेच विनीत आणि चैतन्य साठी आणि क्रिसमसचे औचित्य साधून दोन केक आणले. ते आणण्यातही आमच कसब पाहणे नाही सोडले पुण्याने, तरीही आमच्या मित्रांच्या खुशिमे आम्ही अजून चार चांद लावले. केक कापून आणि त्याचा आस्वाद घेवून फोटो शूट जोरात रंगले, आम्ही दोघे नसतांना बाकीच्या मोठ्यांनी लहान मुलांसारखे वागून चेंडू सोबत मस्त खेळ रंगविला होता. खूप खूप मज्जा केली त्यांनी सुद्धा, केक साफ झाल्यावर
निघण्याच्या तयारीत असलेले मुंबईकर (अगदी धावपळ)  धावत्या भेटीच्या तयारीला लागले.  २५-१२-२०११ ची हि भेट सुद्धा अतिशय मस्तच  झाली. अत्यंत महत्वाचा क्षण आणि त्यात आणखीन एका पुणेकराची भेट अगदी वेळेच्या काठावर जावून झाली. आणि ती भेट होती स्वानंद मारुलकरची....
                   
                 स्वानंदच्या परम भेटीच्या आणि छोट्याश्या ओळख समारंभात १५ - २० मिनिट बुडाल्यावर मात्र निघण्याची तयारी वाढली. आणि मुंबईकरांनी पुणे स्टेशनची वाट धरली. तिकीट काढून पुढच्या प्रवासाची तयारी करून सिंहगड एक्स्प्रेस ने आम्ही पुणे सोडले आणि प्रेमाचे, मायेचे, मैत्रीचे ते गोड प्रसंग मनाशी धरून आम्ही मुंबईकर आमच्या घरी परतलो.

                 या सर्वच गोष्टीत आमचा पुणे प्रवास खूप मजेदार होता. तो  पण जरा वाचून पहा... (ठाणे-पुणे-ठाणे)



महत्वाचे : मध्यंतरी कामात अडकल्यामुळे पोस्ट  टाकण्याचे राहून गेले म्हणून आज तुमच्या समोर मी सदर करीत आहे. तरी मागच्या वर्षीच्या भेटीची कथा तुम्हाला एकविणे महत्वाचेच न म्हणून तरी उशीर केल्या बद्दल क्षमस्व.

    

शुक्रवार, डिसेंबर ०२, २०११

जीवन आपले Computer असते,



अगर जीवन आपले "Computer" असते तर, किती बरे झाले असते

जीवन जगणे चालू करण्या "Start" बटण लागले असते

हृदय आपले "CPU" असते तर विचारांची Print निघाली असती,

हृद्स्पंदने अगर "Pen Drive" असते अन भावनांचा "Backup" घेतला असता,

मनात आपल्या "Bluetooth" असता तर न बोलू शकणाऱ्या गोष्टीना "Transfer" केले असते.

डोळे असते "Webcam" मग दिसणाऱ्या चित्रांना "Receive" केले असते

खरंच जीवन अगर एक "Computer" असते तर त्याला सुद्धा "Restart" केले असते

अन सारे जीवन पुन्हा पुन्हा जागून पहिले असते.

गुरुवार, ऑक्टोबर ०६, २०११

अशी मुंबई !! तशी मुंबई !!!

             


              मुंबई आमची फक्त नावाची नाही तर अस्सल मुंबई आहे. रोज रोज वाचता ते नाही सांगत आहे काही मी!! अरे गैरसमज नको म्हणून म्हंटले.. परवा आमच्या घरी एक पाहुणे आले, आपले अक्खे कुटुंब घेवून (मुंबईकर आहे.) मग आमच्या घरात आदरातिथ्य घेताना पाहुण्या काकी मध्येच बोलल्या,"क्कॉय बाईSईSS उकडत इथे शी!!! कसला बकाल प्रवास ग हा !!! कस बाई जमत हो तुम्हाला? आता काय म्हणायचं त्यांना पण आपली सवय म्हणजे सवय. नाव ठेवलय तर उत्तर नको का द्यायला? मग देवून टाकले उत्तर, "मग मुंबई आहेच घड्याळाची भागीदारीण आळशी नै कै"!!!, असे किस्से रोजच घडत असतात बघा, मागे आमच्या ऑफिसात एक नवीन पोरग भरती झाल.... अगदी नवख हो मुंबईसाठी. ते असो, आधीच नवीन भरती नंतर मुंबईची काही माहिती नाही पण तरीही रात्रपाळीत पहिला प्रश्न विचारला तो पण इथे पब कुठे असतात. अश्या बऱ्याच गमती जमती घडतंच असतात. पण मुंबई म्हणजे सौंदर्याची खाण, तरुणाईची शान अन बेफाम जगण्याचा आनंद... वैगेरे वैगेरे
               मुंबईत आल्यावर कुणाच लक्ष असत ते घड्याळाच्या काट्यावर धावणाऱ्या मुंबईकरांवर, तर कधी लक्ष जात लाईफ-लाईन ठरलेल्या रेल्वे वर, कधी लक्ष केंद्रित होत ते अफाट किनारी धडकणाऱ्या समुद्र किनाऱ्यावर किंवा अंगी रुजलेल्या भिन्न विभिन्न अश्या शैल्लींवर, अनुभव आला कि समजते. आणि नाहीतरी मुंबईवर कित्ती तरी वाक्ये प्रसिद्ध आहेत, जी मनाला भिडतात त्यातल एक म्हणजे "मुंबईत कधी कुणी उपाशी मरत नाही." पण खरच ह! मुंबई म्हणजे अर्ध विश्व आहे इथल्या लोकांसाठी... भ्रष्टी लोक, कष्टी लोक, आनंदी लोक, दु:खी लोक, वेडी लोक, खुळी लोक, गरीब लोक, श्रीमंत लोक, भिकारी लोक, दानी लोक, अभिमानी लोक लिहिता लिहिता अजून एक ब्लॉग बनेल इतकी लोक इथे गुण्या गोविंदाने नांदत असतात. अस चित्र तर दिल्लीत पण दिसत नसेल. वैर असो किंवा मैत्री असो, प्रेम असो किंवा माया असो सर्व काही पुरेपूर भरलेले, तशी मुंबईची व्यावहारिकता सुद्धा वाखाणण्याजोगीच, ती कुणी पहिली आहे कि नाही ते माहिती नाही पण मुंबईला आपण कुठल्या नजरेने पाहतो हे महत्वाचे आहे. आपण मुंबई तर फिरलाच असाल, बरंच काही भेटेल वाचण्यास मुंबई बद्दल परंतु याची देही याची डोळा तिचा अनुभव घेताना मिळणारा आनंद काही औरच आहे. मुंबई माहिती आहे तुम्हाला म्हणजे तीन दिशांनी पाण्याने वेढलेला भू-भाग म्हणून किंवा अजून काही अजून काही तसेच अनंत अश्या गोष्टींनी नटलेली वैगेरे वैगेरे, पण खर तर मुंबई फक्त पाण्याने वेढलेली नाही तर अजून काही गोष्टींनी वेढलेली आहे. त्यात राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि थरारक गोष्टी सुद्धा आहेत बर का! म्हणजे माझा दृष्टीकोन वेगळा आहे मुंबईकडे पाहण्याचा इतकंच. आणि हो मित्रांनो राग नका मानू पण मला तर बाबा फारच गर्व आहे मुंबईचा, मी महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्र माझा हे नित्याचेच आहे. पण त्यापरत्वे जावून मी मुंबईचा मुंबई माझी हे बोलतांना खूप वेगळेपण जाणवते.
               मुंबई देशाची आर्थिक राजधानी असो किंवा महाराष्ट्राची मुख्य राजधानी असो पण एक महत्वाचे म्हणजे मुंबई सर्वांचीच झालेली आहे.(भावनावश), मतभेद, जातीभेद वैगेरे त्यांच्या त्यांच्या जागी पण इथली माणुसकी ५,५ गल्ल्या सोडली कि बदलणारी, एक उदाहरण अस आहे कि जेव्हा मी कामानिम्मित रात्री किंवा दिवसा बाहेर पडतो तेव्हा मुंबईच्या १०० स्वभावांचे दर्शन होते. दिवसा एक एक क्षण मोजून वापरणारी तर रात्री मोजून मोजून एक एक क्षण घालवणारी, तेव्हा माझ्या मनात असंच आले कि मुंबईला तर श्वास घ्यायलाही वेळ नाही. तिची कार्यक्षमता तिची जशी दिवसा तशीच रात्री पण असते. राजकारणांत गुरफटून सुद्धा स्वतःची ओळख शाबूत ठेवणारी, सामजिक घटकांना एकत्र जपून ठेवणारी आणि आर्थिक उलथापालीत स्वतःचा झेंडा नेहमी वर ठेवणारी अशी माझी नामवंत मुंबई. साधारण जगणे, असाधारण वागणे, परिचित असणे, अपरिचित राहणे. कस जमत असाव तिला हे समजण्यापलीकडे हो, तसेच तिचे रक्षक जितके तितकेच भक्षक पण आहेत. जसा तिचा दिवस रंगबेरंगी आणि असंख्य सणांच्या रणधुमाळीने सजतो. तशी रात्र सुद्धा उच्चभ्रू काय आणि निश्चभ्रू काय सारखीच ताणून रंगते. नाट्यमय जीवन जगणे फक्त मुंबई शिकवू शकते हो.... वैशिष्ट्यपूर्ण पण चकवेदार अश्या जीवनशैलीचे रंग भरलेली आहे. कौतुक करायला जशी पुष्कळ जागा आहे न तिच्याकडे तशीच निंदा करण्यास हि मुबलक मु.भा. आहे बर का! आणि ती सुद्धा होतेच. मुंबई म्हणजे मुंबई नाही तर अष्टपैलू जीवन जगणारी आणि जगवणारी एक कलावंतीण आहे. जिच्यात अमेरिका सुद्धा दिसते आफ्रिका सुद्धा दिसते आणि भारत सुद्धा दिसतो. 
                मुंबईच्या ठळक बातम्या, मुंबईच्या विशेष घडामोडी, मुंबईच्या वास्तवदर्शी आणि अविश्वसनीय कथा जेव्हा कानी पडतात तेव्हा प्रत्येकाच्या मनात विचित्र विचारांचे घर नक्कीच होते. मुंबईला विनम्रतेने सुख भोगण्याची जशी सवय आहे तशीच उभ्या डोळ्यांनी स्वतःचा जीव जळतांना पाहण्याची सुद्धा सवय आहे. तिच्यासाठी विश्वात काय जागा असेल ते माहिती नाही पण प्रत्येक मुंबईकरांच्या मनात तर खूप आदर आहे हे नक्की, किती तरी घटनांचा आढावा घेतला तरी असे वाटतच नाही कि काही अनभिशिज्ञ असे काही घडले आहे. जसे कधी सकाळी जिथे कुठला छोटासा अपघात दिसतो. संध्याकाळी तिथे नेहमीसारखी वर्दळ असते. सकाळी ज्या गल्ल्यांमधून भांडणे, कलह ऐकू येतात तिथे संध्याकाळी पूर्ण शांतता असते. तिला जितक्या जवळून पहावी तितके तिचे रंग निराळे होत जातात. तिचा रंग कधी दहशतवादाने लाल होतो तर कधी गणपतीच्या गुलालाने गुलाबी होतो. कधी रमजान ने हिरवा तर कधी एकत्रच रंगत न्हावून जातो. जश्या गुलाबाच्या पाकळ्या उमलातांना जितक्या सुंदर वाटतात न तितक्याच मुंबईच्या रंगांची ओळख हळू हळू आतमध्ये शिरतांना होत असते. तिची ओळख म्हणजे तिचे नाव म्हणूनच मला तर वाटते कि परदेशी नागरिक मुंबई याच कारणाने तर नाही न फिरायला येत असावेत.
                 मुंबई मुंबई करतोय खर पण तुम्हाला काय वाटत मुंबई विषयी हे सुद्धा तितकाच महत्वाच नाही का? मग वाट कसली पाहताय.प्रतिक्रिया द्या....... पुन्हा मुंबईला साद घालायची आहे.....










लेखातील अपात्र किंवा मनाला लागणाऱ्या तसेच काही अक्षम्य चुकीच्या गोष्टी वाटल्यास कृपया पोटात घालाव्यात.

शुक्रवार, सप्टेंबर ०२, २०११

धन्यं जीवन....


हृदय गुंतले कि प्रेम होते !

मन जुळले कि नाते होते ! 

विचार जुळले कि मैत्री होते !

परी सर्व जुळले कि दु:ख का येते !!!




शौर्य दाखविण्या युद्ध जमावे

मैत्र मिळण्या वैर्य नसावे

सुख मिळविण्या ध्येर्य हवे

परी दुख शमविण्या क्रौर्य का हवे !!!





माया दाखविण्या वात्सल्य हवे

कौशल्यवतीन बुद्धिवान हवे

पराक्रमाधीन होण्या बाल हवे

परी नसल्यास सारे रंक म्हणे !!!




दाही दिशीस समाज हा सारा

समाज म्हणजे काय जीवन पसारा

जगण्यासाठी स्वकष्ट हवे

घेतल्यास उपकार का नष्ट व्हावे !!!



भास प्रेमाचा..




भास तुझा तू असल्याचा !

                                     भास तुझा तू नसल्याचा !!

प्रेमात तुझ्या मी असण्याचा कि ! 

                                     प्रीतीत माझ्या तू नसण्याचा !!

भास खरा कि हि आठवण !

                                     अन प्रेम खरे कि ती साठवण !!

व्यक्त अश्या तुज्या भावना तर, 

                                    अव्यक्त असा माझा भास का?

शिथिल होऊनी बघत बसावे !

                                    व्यतीत न होता आठवत राहावे !!

ज्ञात आहे मज डाव हा फासण्याचा !

                                     पण आनंद देतो भास तुझ्या प्रेमाचा !! 




प्रेम फक्त काय प्रेम असत....

आठवणी



मिटलेल्या पापण्यांच्या आड चित्र तुझे उमटले !



अंगावर शहारे अन मनात तुझे रूप दाटले !!



आठवणी येता हृदयी तुझे विश्व मनी नांदते !



ध्यान तुझे येता मनी अश्रू नयनी बळावते !!



प्रश्न येती तरी उत्तर तू एकची सापडे !



अधांतरी जीवन माझे प्रेम तुझे छेडते !!