शनिवार, जुलै २३, २०११

मालिका

 

                        "मालिका" म्हणजे तुम्हाला कळलेच असेल. मला काय म्हणायचं ते! दिवसभराच्या कटकटी, दगदगीतून आपण धावत पळत घरी जातो. मस्त फ्रेश होउन टीव्ही समोर बसतो. आणि चालू होतात मनोरंजनाच्या विविध कहाण्या. १०० पैकी ९९ लोक तर अगदी फॅनच असतात या मालिकांचे आता बघा न मागच्या गुरुवारी मी असंच घरी बसलो होतो. तर शेजारच्या काकू आमच्या आजीसोबत गप्पा मारायला आल्या. सकाळच्या वेळी चहाचा घोट घेता घेता लोक काय विषय काढतील त्याचा नेम नाही. माझी आई आणि त्या काकू तर पिंजरा मालिकेच्या जबरदस्त फॅन झी मराठी ला रात्री ९.०० ला लागणारी हि मालिका आहे तशी जबरदस्त कथानकाची आणि त्यात टाकलेल्या प्रत्येक गोष्टी या दोघी रोज गप्पान मध्ये काढत, तर मी काय सांगत होतो? ह! तर या दोघी चहा पिता पिता चालू झाल्या, "त्या आक्काला जबरदस्त फटका बसलाय हो आता. कसला राग होता हो तिच्या तोंडावर, ते खविसासारखे डोळे कशी वटारून पाहत होती," लगेच काकू आजीला बोलल्या, "काय तरीच बाई ती इरसाल कार्टी शोभत नाही त्या वीर ला, आनंदी कशी मस्त आहे, गरीब पोरगी???, अश्या काहीश्या गप्पा त्यांच्या रंगून गेल्या होत्या, या गोष्टी ऐकतांना मनात भास आला कि, आक्का म्हणजे आमच्या घरातीलच कुणी बाई आहे कि काय? आणि वीर म्हणजे त्या काकूंचा नातू वैगेरे आहे कि काय? असो म्हणजे इतकच कि अत्यंत तळागाळात मालिका पहिल्या जातात आणि त्यावर गॉसिप्स पण रंगतात.
           मालिकांचा प्रभाव इतका आहेच अस नाही. चित्रपट, नाटक यांचा सुद्धा तितकाच प्रभाव गाणी तर आज काल पहिली दुसरीची मुल सुद्धा गुणगुणत फिरत असतातच. कुतुहूल आहे त्यांचे आमची एक कविता कधी पाठ होत नाही त्या पुस्तकातल, पण एक अक्ख गाण मात्र धडधडीत गाऊन दाखवू शकतो. इतकाच काय प्रत्येकाच्या विषयात आज मालिका इतक्या रुजल्यात न कि काय सांगाव, इतर गोष्टींचा प्रभाव असो न असो पण गाणी, चित्रपट आणि मालिकांचा खूप प्रभाव पडतो, आजच्या घडीला मालिका सुद्धा मल्लिका झालीये न मग प्रभाव पडणारच. तर मालिकांच्या विषयत रमणारे माझे मित्र  तर कित्ती विषय काढून काढून बोलतात बिंदास, कलर्स वरचे गच्चाळ कार्यक्रम काहींना इतके भावतात तर काही जणांना नावडतेच, आज आपल्याला दिवस भरात घडणाऱ्या जगभरच्या गोष्टींची बातमी पुरविणाऱ्या बातम्यांची सुद्धा मालिकाच केली गेली आहे. म्हणजे मालिकेशिवाय पर्यायच नाही न! असो आता काय स्टार प्लस वर तर अधिराज्य गाजवलेल्या कित्येक मालिका येवून गेल्या आणि त्या मालिका प्रेक्षकांच्या मनी सुद्धा रुजल्या.
           कलर्स वरच्या सामाजिक घटकावरील आधारित मालिका आपला स्वच्छ संदेश जनतेपर्यंत पोहोचवितात हे खरे, पण त्यांचा राग, रंग, रोष पाहून तो स्वच्छ संदेश कुठेतरी हरवून जातोच न! आपल्यातही असे कितीतरी मालिकाप्रिय लोक आहेतच कि जे स्वच्छ संदेश सोडून इतर गोष्टींमध्ये जास्त रस घेतात, त्याला हि उदाहरण आहे, झी टीव्ही ची मालिका पवित्र रिश्ता माझ्या काही मैत्रीणींना खूप आवडते, फावल्या वेळेत त्यांच्या त्यावरील गप्पा काय सुंदर रंगलेल्या असतात, त्यात मालिकेतल्या पात्रांच्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टी सोडून अर्चनाची साडी, मानवची सुंदरता या वर असलेला विलक्षण प्रेम  इतक उतू येत म्हणून सांगू अजून काय तर स्वप्नांच्या पलीकडे आणि अश्याच काही जुन्या मालिकांचा विषय घेवून ऑफिस मधल्या मुली जेवण कधी संपवतात ते समजतच नाही. आताची तरुण मुले सुद्धा मालिका वीर बनतात हो कधी कधी, एकदा काय मालिकेत नवीन काही प्रेम विषयक दाखविले कि ते सुद्धा प्रेमासक्त होतातच. तसच राजकारण आणि समाजकारण, भक्ती आणि शक्ती अश्या अनन्य विषयावर आधारित कित्येक मालिका आपण रोज पाहतो आणि रोज त्यांचा आनंद घेतो. आणि त्यांचा आपल्या आयुष्यावर खूप प्रभाव आहे. काही ठिकाणी आपण चांगले उचलतो आणि काही ठिकाणी आपण वाईट सुद्धा उचलतो. सासू - सुनेच्या आधारित असलेल्या मालिका सासवा-सुना एकत्र  बसून पाहतात. तर कार्टून आणि लहान मुलांवरील काही सिरियल्स तर इतक्या रंगतदार असतात कि आज्या - नातवांची चिमुकल्या नात्खात भांडणान मध्ये आजोबा आपल्या नातवापासून नेहमीच माघार घेतात. लडिवाळ, प्रेम, माया आणि संस्कृती शिकवणाऱ्या या मालिका बंद झाल्या तर थोडस मन नाराज सुद्धा होणारच कि, शत्रूवर वार, मित्रावर भार या गोष्टी सुद्धातितक्याच महत्वाच्या न!

                    मालिकांवर असलेले हे प्रेक्षकांचे प्रेम कसे काय दुरावू शकते. मालिकांमुळे रोज रोज घडणाऱ्या या नवीन नवीन गोष्टी आणि त्यांची उदाहरणे तुमच्या सुद्धा डोळ्या समोर उभी राहिली असतील न! मला सुद्धा असंच वाटले, म्हणून आज तुम्हाला सुद्धा सांगितले. पहा आणि आनंद घेतच रहा अश्या नवीन नवीन मालिकांचा.. 

बुधवार, जुलै २०, २०११

शब्दांच्या पलीकडले शब्द...

शब्द म्हणजे काय असतं, 

भावनांनी भरलेलं एक गाव असतं,

शब्द म्हणजे व्यक्त होण्याचा संदर्भ असतो,

व्यक्ती आणि विषयाला जोडणारा तो पूल असतो,

स्तुती सुमनांची शब्दांत भरलेली भेळ  असते,

राग-रोषांचा जणू शाब्दिक खेळ असतो,

शब्द विचारांचा भक्कम पाया असतात,

शब्द म्हणजे बोलण्यासाठी लागणारे बळ असतात,

शब्द म्हणजे चकाकणाऱ्या तलवारीची धार असते,

शब्द म्हणजे माउलीच्या मायेची पाखर असते.    

शब्द जन्म आणि मृत्यूचे मार्मिक वर्णन असतात,

स्वर्गाचे द्वार असे हे "शब्दांच्या पलीकडले शब्द" असतात.  

मंगळवार, जुलै १९, २०११

विकली मुंबई!!!

मानेवरच्या तलवारीची धार का बोथटली 

त्या रक्तरंजित दिवसांची आठवण तयांच्या मनी खुंटली,

वाघ गेला लांडगा आला कारभार राज्यास तयांचा कधी न उमगला,

  थेंब थेंब रक्त सांडते तरी भ्रष्ट कारभार नाही सुटला,

श्वास तुटला, विश्वास मुकला, बधीर होऊनी किंकाळ्या मात्र ऐकल्या,

येवून थाटती बाजार लाज का मनी नाही उरली,

सोन्याची या माती केली, दगडांवरती पदे कोरली,

पितळ पांढरी मने ज्यांची जाहली. कृतघ्नतेची परिसीमा गाठली,

मरताची रोजची मुंगीपरी माणसे म्हणुनी वाच्यता कशी करुनी सोडली,

पैशांच्या बाजारी विकुनी माय आपुली दान धर्माच्या नावाखाली त्याची दिसे काळी सावली,

मरणाच्या सद्जनाच्या पैशांची देतात जांभई,

श्वानधर्म जणू अंगी त्यांनी खाल्ली विकुनी मुंबई, खाल्ली विकुनी मुंबई.....










शुक्रवार, जुलै १५, २०११

राग मुंबईतल्या नागरिकांचा..

दोन दिवस घरी टीव्ही वरच्या बातम्या पाहून डोक हैराण झालय, किती ते आणि काय होत ते काही समजेना, काल आय बी एन लोकमत वर पण साक्षात चुतीयागिरी पाहायला मिळाली. आणि परवा स्टार न्यूज वाल्यांना तर आपला स्वतःचा काय सत्कार करून घ्यायचा उत आलेला ते समजे ना! मुर्खांचा बाजार म्हणव कि बाजारातले मूर्ख! जाहिराती सोडाच पण यावेळी  राजकारण पण बरेच स्वार्थी झालेले होते आणि उलटी गंगा म्हणून वाहायला लागले होते. शब्द बरे होते पण वेळ चुकली हे खर आणि सोनिया गांधीने आपल्या मुलाच्या माकडउड्या आताच थांबवाव्यात. बालपणी बाळकडू दिलेले दिसत नाही. लहान मुलासारखे वक्तव्य चक्क मिडिया समोर तो करत होता. या चिमण्या बाळाला अक्कल यावी हीच  सदिच्छा! आता याला एकट्या माकडाला काय तर जनता आता याच्यासारख्या प्रत्येक माकडाला सोडणार नाही आहे.


मुंबईवरचा हल्ला म्हणजे दिवाळी आहे का?  जो तो उठतो काहीही बारगळतो आहे ते..... मागच्या कसाबने केलेल्या हल्ल्याला सुद्धा आर आर ने आरारा काय ओकले ते आजपण लक्षात आहे. काय, अश्या मोठ्या मोठ्या शहरात छोट्या छोट्या गोष्टी होतच राहतात. वक्तव्य काही करोत हि लोक, पण नागरिकांनो, मुंबईकरांनो भारत हे एक राष्ट्र आहे. त्याच्या कुठल्याही प्रांतात, गावात, शहरात, गल्ली-बोळात हे गुन्हे घडणे थांबवायचे काम या लोकांचे आहे. आणि तेच काम त्यांनी आजतागायत केलेले नाही आहे.


प्रश्न दहशदवाद नाही, प्रश्न आहे दहशदीचा जी आज लोकांच्या मनात दडली आहे. आणि त्याला जोड देवून त्यावर गप्पा मारणाऱ्या या नेत्यांचा! काय तर म्हणे मुंबईकरांची व्हील पॉवर खूप जास्त आहे. काय स्पिरीट आहे त्यांच्यात? असा कानामागे खणखणात काढावा असे वाटले पण काय करणार आपण त्यातही काही करू शकत नाही. या राजकारण्यांनी आणि मिडियावाल्यांनी मिळून खरच मुंबईकरांना हतबल केलंय का? काम आणि घर इतकेच राहिलेय का? वास्तव चुकवून हे लोक कसल्या परीकथेतल्या जादूच्या गोष्टी दाखवतायत? काहीतरी विचार करावा. याचा संपूर्ण प्रभाव आपल्या सर्वसामान्य जनतेवर होतो आहे. सकाळचीच गोष्ट मी प्रवास करीत असलेल्या लोकल ट्रेन मध्ये सकाळी एक बँग होती. कुणाची होती देव जाणो, लोकांनी दहा वेळा आवाज दिला कुणी उत्तर देत नाही. म्हणून ती बँग सरळ बाहेर फेकून देण्यात आली. कुणाची बँग? कसली बँग? काही विचार करू शकत नव्हतेच ते उगाच कोण अंगाशी घेईल नको ते प्रकरण. म्हणून तिला सरळ बाहेर फेकून देण्यात आले. तिचा छडा लागेपर्यंत बॉम्ब वैगेरे फुटायचा त्यापेक्षा ती बाहेर फेकलेली बरी हे प्रथम त्या व्यक्तींच्या मनात! मग कित्ती लोक सहन करू शकतात. कुठे तरी हा राग व्यक्त होणारच.


आपल्याला  काय या नेते मंडळींचा उपयोग आहे का? आज वाचले कि एटीएस आणि क्राइम ब्रांच मिळून या गोष्टींचा शोध लावणार आहेत. पण काय छडा लावणार आहेत. मागच्या ९/११ च्या रात्री जसे "चू" सारखे वागले तसे आत्ता हि वागतच आहेत न! आज हि मिडिया एक गोष्ट लपवायला तयार नाही. काही धागा लागला कि आली ब्रेकिंग न्यूज यांची न्यूज काय फ़क़्त मुंबईवाले वाचणार आहेत का? इतर लोक नाहीत का? त्यातच हि  नेते मंडळी आपली सुंदर तोंड घेवून कॅमेरा समोर जे येतंय ते बरळतायत आणि आपण हे फ़क़्त पाहतोय. किती दिवस हा खेळ चालायचा. 


दुनियेच्या पाठीवर उभे राहून राज्य करण्याची शक्ती एकट्या मुंबईत आहे. हे माहिती आहे म्हणून तर मुंबईला सारखे सारखे टार्गेट केले जाते. आणि महत्वाचे या नेत्यांना तिला टार्गेट केलेले पाहावेसे वाटते.आपण भोगतोय त्यासर्व गोष्टी निष्पन्न होत नाहीत बोलल्याशिवाय किंवा केल्याशिवाय आणि हे आपले दुराचारी नेते करीत आहे. मी साधारण माणूस आपला राग व्यक्त करणार तरी कसा हे माहिती आहे न त्याना मग फावते आहे चांगलेच... आय बी एन लोकमत फेमस निखील वागळेच्या मुलाखतीत अडकलेल्या त्या महारथींनी काल घडलेला बॉम्ब स्फोट सोडून १९९४ च्या मुंबई हल्ल्यावर प्रश्न उचलले गेले होते. अजून काय तर ज्या सोई सुविधा पुरविण्यात आलेल्या आहेत. त्या अजून यायच्या बाकी आहेत. एक वर्ष झाले तरी कसब सुळावर चढेना आणि म्हणतायत कि पोलीस दलात आणखीन चांगल्या यंत्रांना आणणार आहे. एक वर्ष काय फ़क़्त प्रयत्न करायचे आहेत का? सरळ सरळ अन्यायी वागणे, बोलणे जणू काही अंगीच बळावले आहे नेत्यांच्या. २६/११ काय? ९/११ काय? १३/०७ काय? छापून आणायला मजा येतेय मिडीयाला आणि पत्रकारितेला!


मुंबईची सहनशक्ती पहिली आहे या नेत्यांनी आणि सर्व जगाने, आता राग पाहण्याची वेळ आलेली आहे. आज नाही तर उद्या हि ताकद तुम्हाला पुरल्याशिवाय राहणार नाही...




सावधान.............. 



गुरुवार, जुलै ०७, २०११

शेवटचे प्रेम


श्वास आखरीचा हृदयात गुंतला, डोळ्यात अश्रूंचा थेंब हा लपला.


आली जीवनी तिच्या काळरात्र सोसेना भार तरी जड डोईवरी पात्र
क्षणात आठवणीनी कंठ हा दाटे, शेवट उभा सामोरी दुख: मनी वाटे
दैन्य नाही दुख: नाही, आठवणीत प्रियाच्या जीव व्यापला.
श्वास आखरीचा हृदयात गुंतला, डोळ्यात अश्रूंचा थेंब हा लपला.



श्वास तुटतो, मनी तुज पुकारतो, अश्रूंच्या धारातून जीव ओकारतो
आकांत प्रियेच्या कानी पडुनी, शेवटचे पाहू ध्यास एकच राही मनी
वेळ नाही हाती तीच्या, परी तिने ओठी शब्द फोडू पहिला
श्वास आखरीचा हृदयात गुंतला, डोळ्यात अश्रूंचा थेंब हा लपला.


साजण समोर नजरेत वाकलेला , पाहता जीव कासावीस सोकला
ओठात शब्द तुटतो हृदयात प्राण फुटतो, मिठीत प्रेमाच्या सोडूनी जाऊ पाहतो 
कसे जावे, कसे राहावे शेवटी जीव सुटला, बंध तोडूनी प्राण झाला मोकळा
श्वास आखरीचा हृदयात गुंतला, डोळ्यात अश्रूंचा थेंब हा लपला.  



--- कल्पेश मोहिते --->